हे 6 उपाय करा आणि घरातील डासांपासून मुक्ती मिळावा
पावसाळा म्हटलं कि दूषित पाणी आणि त्यामुळे होणाऱ्या मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया या आजारांची लागण होते. साचलेल्या दूषित आणि जास्त दिवस ठेवलेल्या स्वच्छ पाण्यातही डासांची पैदास खूप लवकर होते. डासांपासून संरक्षण व्हावे यासाठी तऱ्हेतऱ्हेची कॉईल, लिक्विड आणि मच्छरदाणीचा वापर आपण करतो. पावसाळ्यात डासांपासून होणाऱ्या आजारांना टाळण्यासाठी आपण काही घरगुती उपायही करू शकतो.
घरगुती उपाय कोणते ते पाहू ?
- लिंबू कापून घरात ठेवल्यास आजूबाजूला असलेले डास पळून जातात.
- खोडी लवंग खोबरेल तेलात मिसळून शरीराला लावल्यास डास चावण्याची भीती नसते.
- तुळशीच्या पानांचा रस लावल्यास डास चावत नाहीत.
- संत्र्याच्या सुकवलेल्या साली कोळश्यावर भाजल्यास त्या वासाने डास नाहीसे होतात.
- ऑल आऊटची बाटली रिकामी झाल्यास त्यामधे कडुलिंबाचे तेल आणि कापूर घालून ती लावा. असे केल्याने डास घरात येणार नाहीत.