Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

संजय गांधी आणि मेनका यांची लव्ह स्टोरी

संजय गांधींनी मेनका यांची एक जाहिरात बघितली आणि इथून सुरू झाली त्यांच्या प्रेमकहाणीची सुरवात

29 जुलै 1974 रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून एक घोषणा करण्यात आली. ही घोषणा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या लहान मुलाच्या लग्नाविषयी होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीचा मुलगा संजय गांधी यांचा मेनका आनंदशी साखरपुडा सफदरजंग रोड येथील एका छोट्या सोहळ्यामध्ये हा कार्यक्रम पार पडला. मात्र, ही बातमी पसरताच पंतप्रधानांच्या मुलाशी कोणाचे लग्न होत आहे, ती मुलगी कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली होती.

विनोद मेहता यांनी आपल्या The Sanjay Story या पुस्तकात लिहिले आहे की मेनकानी दिल्ली क्लास मिलसाठी म्हणजेच DCM साठी टॉवेलची जाहिरात केली होती. या जाहिरातीचे सगळ्या दिल्लीत होर्डिंग्ज लावण्यात आले होते. त्यावेळी अचानक ही जाहिरात करणाऱ्या अ‍ॅड एजंसीला श्रीमती आनंद म्हणजेच मेनकाच्या आईचा फोन आला की जाहिरातीची ही होर्डिंग्ज त्वरित हटवावीत व त्यांच्या मुलीची सर्व छायाचित्रे परत करावी. त्याच रात्री दिल्लीतील सगळे होर्डिंग्ज काढण्यात आले.

maneka gandhi, sanjay gandhi death, sanjay gandhi wife, sanjay gandhi and maneka, maneka anand, love story of sanjay and maneka gandhi, indira gandhi, sanjay and maneka gandhi marriage, sanjay and menaka gandhi love story in marathi, संजय गांधी आणि मेनका यांची लव्ह स्टोरी, संजय गांधी, मेनका गांधी, संजय गांधी मृत्य, संजय गांधी आणि मेनका प्रेमकहाणी
Maneka Gandhi DCM Towel Ad

संजय आणि मेनका यांच्या प्रेमाला कशी सुरवात झाली ? (Sanjay Gandhi and Maneka Love Story)

“खरतर संजय गांधींना ही जाहिरात पाहून भुरळ पडली होती आणि त्यांना मेनका आवडल्या होत्या. योगायोगाने संजय मेनकांची चुलत बहीण वीणू कपूरचे मित्र होते. वीणूच्या लग्नाच्या निमित्ताने कॉकटेल पार्टीत संजय आणि मनेका भेटले. ही त्यांची पहिली भेट होती. तेव्हा मेनका 17 वर्षांच्या होत्या. दुसर्‍या दिवशी त्या दोघांनी पुन्हा भेटण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे त्यांच्या भेटी वाढत गेल्या. त्याच दिवसांत संजय गांधींचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यावेळी मेनका रोज त्यांना दवाखान्यात भेटायला जात असत. ते दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांना देखील कळले नाही.

जेव्हा Sanjay Gandhi यांनी मेनकाला मागणी घातली

विनोद मेहता यांनी “द संजय स्टोरी” मध्ये लिहिले आहे, “संजयने दिवंगत कर्नल आनंद (मेनका यांचे वडील) यांच्याकडे मेनका संदर्भात लग्नाची मागणी केली. कर्नल आनंद म्हणाले की, आमचा आक्षेप नाही, परंतु प्रथम त्यांनी त्यांच्या आईशी (इंदिराजींशी) बोलले पाहिजे. “

जेव्हा श्रीमती इंदिरा गांधींनी ऐकले की आपला मुलगा लग्न करण्याचा विचार करीत आहे, तेव्हा त्यांना आपल्या मुलासाठी मेनका किती चांगली आहे याची खात्री नव्हती. इंदिराजींनी Maneka यांना भेटायला बोलावले. त्या तिच्याशी अत्यंत गंभीरपणे बोलल्या, संभाषणात त्यानी दोन मुद्द्यांवर विशेष जोर दिला, प्रथम आपल्या मुलाबरोबर राहणे सोपे नाही आणि दुसरी गोष्ट इंदिराजींना अधिक चिंता करत होती की संजय मेनकापेक्षा दहा वर्षांनी मोठे आहेत. मेनकाने उत्तर दिले, तिला या दोन्ही गोष्टी माहित आहेत अन तिला यासंदर्भात काहीच हरकत नाही.

29 सप्टेंबर 1974 रोजी हे लग्न अगदी साधेपणाने पार पडले. गांधी घराण्याचे मित्र मोहम्मद युनूस यांच्या घरी हा विवाह सोहळा पार पडला. त्यात फक्त कुटुंबाच्या जवळच्या लोकांना बोलाविण्यात आले होते. अगदी पत्रकार आणि मीडियालाही यापासून दूर ठेवण्यात आले होते. हनीमूनवर जाण्याऐवजी दुसर्‍या दिवशी मेनका तिच्या जर्मन क्लासला गेली आणि संजय त्यांच्या कारच्या कारखान्यात गेले. हे लग्न चांगले झाले असले तरीही काही लोकांचा असा अंदाज होता की हे लग्न १ वर्षापेक्षा अधिक काळ टिकणार नाही.

maneka gandhi, sanjay gandhi death, sanjay gandhi wife, sanjay gandhi and maneka, maneka anand, love story of sanjay and maneka gandhi, indira gandhi, sanjay and maneka gandhi marriage, sanjay and menaka gandhi love story in marathi, संजय गांधी आणि मेनका यांची लव्ह स्टोरी, संजय गांधी, मेनका गांधी, संजय गांधी मृत्य, संजय गांधी आणि मेनका प्रेमकहाणी

Sanjay Gandhi यांच्या मृत्यूच्या काही महिन्यांनंतर मेनका आणि इंदिरा यांच्यात मतभेद होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. Absolute Khushwant या पुस्तकात खुशवंत सिंह यांनी लिहिले आहे की, “इंदिराजींनी मनेका यांच्यासोबत खेड्यातील सासूसारखे वागण्यास सुरुवात केली. एक वर्षानंतर सासू आणि सून यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि मेनका गांधी पंतप्रधानांचे घर सोडून गेल्या.

संजय गांधींचा धक्कादायक मृत्यू (Sanjay Gandhi Death)

23 जून 1980 रोजी धक्कादायक बातमी आली. ती संजय गांधीचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी होती. वादळी परिस्थितीत विमान उडवण्याची त्यांना आवड होती. १९७६ मध्ये त्यांना विमान उडवण्याचा परवाना मिळाला. इंदिरा गांधींनी सत्तेतून बाहेर पडताच जनता सरकारने तो काढून घेतला. परत इंदिरा गांधी सत्तेत आल्याबरोबर त्यांना हा परवाना परत मिळाला. मे 1980 मध्ये ‘Pits S2A’ या दोन सीटर विमानांना भारतात आयातीसाठी मान्यता देण्यात आली. काही काळानंतर हे विमान सफदरजंग विमानतळावरील दिल्ली फ्लाइंग क्लबमध्येही पोहोचले देखील.

21 जून 1980 रोजी संजय गांधींनी नवीन पिट्स विमान चालवण्याचा प्रयत्न केला. दुसर्‍या दिवशी २२ जून रोजी विमान 40 मिनिटांसाठी दिल्लीच्या आकाशात उडवत राहिले. 23 जून रोजी ते पुन्हा विमान उड्डाण करण्यासाठी आले, तेव्हा त्यांच्या सोबत इन्स्ट्रक्टर सुभाष सक्सेना होते.

साडेसातच्या सुमारास विमानाने उडान केले. सुरक्षेच्या नियमांना अनुसरून निवासी क्षेत्रावर तीन फेऱ्या मारल्या. चौथी फेरी मारणार त्याच वेळी विमानाचे अचानक इंजिन बंद पडले. पिट्स वेगाने वळून समोरच्या बाजूने जमिनीवर आदळले. विमानाचा चक्काचूर झाला होता, त्यामधून काळा धूर निघत होता. दोघांनाही विमानाच्या अडकलेल्या भागातून काढण्यात आले. ताबडतोब त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेले, तिथे दोघांनाही मृत घोषित करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.