Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

स्वराज्यावरील परकीय आक्रमण हाणून पाडणारी शिवाजी महाराजांची युद्धनीती

शिवाजी महाराजांची युद्धनीती कशी होती आणि कशा पद्धतीने शिवरायांनी या युद्धनीतीमुळे स्वराज्याला बळकट केले आणि स्वराज्यावरील परकीय आक्रमण हाणून पाडले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आयुष्य सर्वांसाठी एक आदर्श आहे आणि पुढे भविष्यात देखील आदर्श राहील. आज आपण पाहूया शिवरायांच्या आयुष्यातील एक महत्वाचा पैलू म्हणजेच महाराजांची युद्धनीती. याच युद्धनीतीमुळे शिवरायांचे व रयतेचे स्वराज्य घडले, टिकले आणि वाढले. शिवराय हे त्यांच्या विचारात, कार्यात आणि वागण्यात काळाच्याही पुढे होते. शिवाजी महाराजांची युद्धनीती कशी होती आणि कशा पद्धतीने शिवरायांनी या युद्धनीतीमुळे स्वराज्याला बळकट केले आणि स्वराज्यावरील परकीय आक्रमण हाणून पाडले.

युद्धनीती म्हणजे काय ?

शिवरायांची युद्धनीती काय व कशी होती हे समजून घेण्याआधी आपण बघूया कि युद्धनीती म्हणजे काय ? डॉ. पी.एस. जगताप त्यांच्या पुस्तकात म्हणतात कि; ‘काळ, वेळ, प्रसंग, भूप्रदेश, शत्रुपक्षातील सैनिक संख्या या सर्वांचा विचार करून कोणती युद्धपद्धती वापरावयाची ते ठरविणे म्हणजे युद्धनीती होय’. हि युद्धनीती ठरविण्यात Shivaji Maharaj अतिशय चपखल होते.

शिवाजी महाराजांची युद्धनीती, shivaji maharaj photos, shivaji maharaj information, shivaji maharaj story, shivaji maharaj in marathi, chatrapati shivaji maharaj history, shivaji maharaj history in marathi, shivaji maharaj biography, shivaji maharaj mahiti, shivaji the great guerrilla, shivaji maharaj war tactics, ganimi kava, Shivaji Maharaj war strategy in Marathi, गनिमी कावा म्हणजे काय, shivaji maharaj battle, how did shivaji army use guerrilla warfare, maratha empire, shivaji maharaj essay, शिवाजी महाराज निबंध, shivaji maharaj strategy
Shivaji Maharaj war strategy

शिवरायांचे सैन्य संख्येने अतिशय कमी होते परंतु स्वराज्याचा एक मावळा सुद्धा अनेकांवर भारी होता. अशी बळकट फौज शिवरायांच्या साथीला होती, सोबतच शिवरायांचे बुद्धीचातुर्य अफाट होते, या जोरावर शिवरायांनी मराठ्यांपेक्षा अनेक पटींनी मोठ्या असलेल्या अनेक परकीय सत्तांचे आक्रमण हाणून पाडले. शिवरायांच्या युद्धनीतीमध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ‘गनिमी कावा’ होय.

मलिक अंबर यांना गनिमी कावा या युद्धनीतीचे जनक मानले जाते. स्वराज्याची भौगोलिक परिस्थिती आणि आपले सैन्यबळ लक्षात घेऊन शिवरायांनी गनिमी कावा हि युद्धनीती वापरली. जेव्हा शत्रूचे सैन्य आपल्या सैन्यापेक्षा अधिक असते, शत्रूकडे आपल्यापेक्षा जास्त व आधुनिक शस्त्रसामुग्री असते आणि जेव्हा अशा परिस्थितीत शत्रूशी युद्ध करूनही आपली कमीत कमी हानी होणे व शत्रूची हानी जास्त होणे अपेक्षित असेल अशा वेळी गनिमी कावा या युद्धनीतीचा वापर केला जातो.

गनिमी कावा म्हणजे काय ? (Shivaji Maharaj Guerrilla Warfare Tactic)

शिवरायांची गनिमी कावा युद्धनीती सोप्या शब्दांत सांगायची तर अशी कि, आपले सैन्य कमी आहे आणि शत्रूचे अधिक, आपले लक्ष्य आहे कि शत्रूच्या सैनिकांची अधिक हानी व्हावी; मग अशा वेळी महाराज गनिमी कावा युद्धनीती वापरून लढत. नेमका शत्रू बेसावध असताना Shivray हल्ला करण्याची वेळ साधत असत. शत्रू बेसावध असतांना शिवरायांचे घोडदळ अचानक मुसंडी मारायचे व शत्रूच्या सेनेला खिंडार पाडून हे सैन्य मागे येत असे. यामुळे बेसावध असलेली शत्रूसेना गोंधळून जाई आणि ती सेना भानावर येईपर्यंत शिवरायांचे सैन्य पुन्हा अचानक हल्ला करत असे.

गनिमी काव्याचे उत्तम उदाहरण म्हणजे….

गनिमी काव्याचे एक उत्तम व इतिहासात अजरामर असे उदाहरण म्हणजे अफझलखानाचा वध आणि अफझल खानाच्या सैन्यावर शिवरायांच्या सैन्याने अचानक केलेला हल्ला होय. अफझलखान हा स्वराज्याचा व शिवाजी महाराजांचा शत्रू होता. आला तर होता शिवाजी महाराजांना संपवायला परंतु महाराजांच्या युक्तीने आणि मावळ्यांच्या शक्तीने अफझलखान व त्याचे सैन्य स्वतःच जिवंत परत गेले नाही. अफझलखान स्वतः अतिशय बलवान होता आणि सोबतच त्याने अफाट सैन्य व शस्त्रसाठा आणला होता.

साहजिकच शिवरायांचे सैन्य अफझलखानाच्या सैन्यापुढे टिकले नसते कारण ते संख्येने आणि शस्त्रसाठ्याने देखील कमी होते. एकंदरीतच अफझलखान मोकळ्या रणांगणावर लढणारा, त्यात त्याचा सैन्य व शस्त्रसाठा अफाट आणि महाराष्ट्रामधील डोंगरदऱ्यांचा व झाडाझुडपांच्या प्रदेशात लढाई करणे त्याला व त्याच्या अफाट सैन्याला अवघड जाणार. हे सर्व जाणून, लक्षात घेऊनच शिवरायांनी ओळखले कि शत्रू तर आपल्याला प्रतिकूल असलेल्या ठिकाणी ठाण मांडून आहे आणि म्हणूनच शत्रूवर मात करण्यासाठी शत्रूला प्रतिकूल व आपल्याला अनुकूल अशा जागेतच शत्रूला आणणे गरजेचे आहे.

शिवाजी महाराजांची युद्धनीती, shivaji maharaj photos, shivaji maharaj information, shivaji maharaj story, shivaji maharaj in marathi, chatrapati shivaji maharaj history, shivaji maharaj history in marathi, shivaji maharaj biography, shivaji maharaj mahiti, shivaji the great guerrilla, shivaji maharaj war tactics, ganimi kava, Shivaji Maharaj war strategy in Marathi, गनिमी कावा म्हणजे काय, shivaji maharaj battle, how did shivaji army use guerrilla warfare, maratha empire, shivaji maharaj essay, शिवाजी महाराज निबंध, shivaji maharaj strategy
shivaji maharaj war tactics

म्हणूनच बघा प्रतापगड भेटीसाठी निवडला, खानाचे सैन्य पायथ्याशी घनदाट जावळीच्या जंगलात उभे, त्यांच्या नकळत त्याच जंगलात शिवरायांचे देखील सैन्य लपले आणि गडावरून अफझलखानाच्या वधाचे संदेश देणारे तोफेचे बार ऐकले आणि महाराजांचे सैन्य खानाच्या बेसावध सैन्यावर तुटून पडले आणि सारे शत्रू सैन्य अगदी जीव मुठीत घेऊन मिळेल तेथे पळत सुटले. अशा तर्हेने शिवरायांनी एका मोठ्या बलाढ्य शत्रूला आपल्या युद्धनीतीने पराभूत केले व आपल्या बुद्धीचा व मावळ्यांच्या शक्तीचा प्रत्यय दर्शविला.

शिवरायांच्या इतर युद्धनीती (Shivaji Maharaj war strategy)

याहूनही अनेक वेळा शिवरायांनी आपल्या वेगळ्या युद्धनीतीचा प्रत्यय आणला आहे. अनेक लढायांमध्ये मुद्दाम Shivaji Maharaj यांचे सैन्य पराभव झाल्यासारखे माघार घेऊन पळ काढते आणि शत्रूचे सैन्य त्यांच्या पाठी आले कि अचानक एक दुसरी तुकडी शत्रूच्या बाकी सैन्यावर तुटून पडत असे. अशा प्रकारे शत्रूला चकवून अनेकवेळा शिवरायांनी पराभूत केले आहे.

लेखक सच्चीदानंद शेवडे व दुर्गेश परुळकर यांच्या शिवरायांची युद्धनीती या लिखाणात ते शिवरायांच्या युद्धनीतीबद्दल सांगताना म्हणतात कि; ‘एकाच जागी शत्रूसैन्य जमा झालेले असेल तर अशावेळी हत्तींना सैन्यावर सोडून द्यायचे व शत्रूसैन्य पांगवायचे. शत्रू आघाडीवर चाल करत असेल तर शत्रूच्या पिछाडीवर हल्ला करायचा, कधी उजव्या तर कधी डाव्या बाजूने हल्ला करायचा. अशा प्रकारांमुळे शत्रूसैन्य पांगते आणि अशा पांगलेल्या शत्रुसैन्याचा पराभव करणे अवघड नसते.’

कूट युद्धनीती

शिवाजी महाराजांनी अनेकवेळा कूट युद्धनीती देखील वापरली आहे. अनेक वनदुर्ग, घनदाट व काटेकुटे असलेले प्रदेश, डोंगरांचे शिखर, उंच आणि सखल जमीन असलेल्या ठिकाणी हि युद्धनीती शिवरायांनी वापरली. अशा युद्धप्रकारात शिवरायांचे सैन्य शक्यतो दिवसा लढाई करीत नसे, उलट रात्रीच्या वेळी अशा ठिकाणी हल्ला करत. तानाजी मालुसरेंनी केलेली कोंढाण्यावरील चढाई, शिवरायांच्या सैन्याने अनेक वेळा अचानक रात्री दिलेले वेढे असे अनेक प्रकार या कूट युद्धनीतीमधील उदारहणे आहेत.

अनेकवेळा महाराजांनी शत्रू चाल करून येई पर्यंत वाट पाहिली व ज्या वेळी, ज्या परिस्थितीत शत्रूशी युद्ध होईल त्या क्षणी लढायला सज्ज झाले. बरेचदा युद्ध केंव्हा, कुठे व कशा पद्धतीने करायचे हे शत्रूवर अवलंबून न राहता शिवाजी महाराज ठरवायचे आणि ते स्वतः आपले व शत्रूचे सैन्यबळ लक्षात घेऊन सर्व निर्णय घेत असत. शत्रूपेक्षा आपले सैन्यबळ कमी असेल तेंव्हा युक्तीने कशी बाजी मारता येते हे शिवरायांनी सिद्ध केले आहे. Shivaji Maharaj योद्धा म्हणून अतिशय बुद्धिवान, चपळ, बलवान व चतुर होते.

स्वराज्यावर चालून येणार प्रथम शत्रू फत्तेखान असो, अजस्त्र असा अफझलखान, शायिस्ताखान, सुरतेची केलेली लूट, जावळीचे युद्ध आणि अशा अनेक प्रसंगी शिवरायांनी बळासोबत बुद्धीचाही उपयोग करून अतुल्य पराक्रम केले आहेत. युद्धभूमीवर जाण्याआधी सैन्याची केलेली तपासणी, सैन्याची योग्य व्यवस्था, त्यांच्या परिवाराला सुरक्षितता, शस्त्रांची सुसज्जता, मावळ्यांवरील विश्वास, युद्धाआधी केलेली आखणी, सैन्याची योग्य विभागणी अशा अनेक गुणांमुळे शिवरायांचे मुठभर मावळे देखील अनेक शत्रुंना पळता भुई थोडी करीत होते.

शिवाजी महाराजांची युद्धनीती, shivaji maharaj photos, shivaji maharaj information, shivaji maharaj story, shivaji maharaj in marathi, chatrapati shivaji maharaj history, shivaji maharaj history in marathi, shivaji maharaj biography, shivaji maharaj mahiti, shivaji the great guerrilla, shivaji maharaj war tactics, ganimi kava, Shivaji Maharaj war strategy in Marathi, गनिमी कावा म्हणजे काय, shivaji maharaj battle, how did shivaji army use guerrilla warfare, maratha empire, shivaji maharaj essay, शिवाजी महाराज निबंध, shivaji maharaj strategy
Shivaji Maharaj in Marathi, Shivaji Maharaj Photos

एक योद्धा म्हणून शिवरायांचे रणांगणावरील वर्णन करतांना कविराज भुषण म्हणतात,

‘महाराज सिवराज चढत तुरंग पर
ग्रीवा जात नै करि गनिम अतिबलकी
भूषन चलता सरजा की सैन छिती पर
छाती दरकती है खरी अखिल खल की’

शिवरायांची एक योद्धा म्हणून युद्धनीती अतिशय प्रभावी होती. आपले सैन्यबळ कमी आहे हे जाणूनच शिवरायांनी शक्यतो अनेक लढाया या स्वतःच्या निवडलेल्या जागीच लढल्या, त्यामुळे सहाजिकच शत्रूला शिवरायांचा पराभव करणे अवघड होई. इतकेच नव्हे तर महाराजांनी एक प्रभावी आरमार देखील उभे केले आणि समुद्रावर सुद्धा वचक बसवायला सुरुवात केली. म्हणूनच शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात येताना शत्रू अनेकदा विचार करूनच येत असे. आपल्या युद्धनीतीवरच शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या आणि स्वराज्य अबाधित ठेवले, विस्तारले आणि मावळ्यांमध्ये विजयाचा जोश कायम तेवत ठेवला.

Leave A Reply

Your email address will not be published.